Share to: share facebook share twitter share wa share telegram print page

ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी

ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी (इंग्रजी: Administration and Finance of the East India Company; मराठी: ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनीती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक शोधनिबंध आहे, जो त्यांनी एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला १५ मे १९१५ रोजी सादर केला होता. हा ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ ते १८५८ या कालखंडात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार आणि वित्त या संदर्भातील धोरणांच्या बदलाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक धोरणे भारतीयांच्या हालअप्तेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे विदारक आर्थिक स्थितीचे स्वरूप या प्रबंधात मांडले आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Ambedkar, Bhimrao Ramji (2017-02-11). Administration and Finance of the East India Company (इंग्रजी भाषेत). Independently Published. ISBN 978-1-5205-7763-0.
Prefix: a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9

Portal di Ensiklopedia Dunia

Kembali kehalaman sebelumnya